HW News Marathi
महाराष्ट्र

आता रामदास आठवले कुठे गेले? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | उत्तरप्रदेशातील हाथरस तेथे झालेल्या तरुणीवर बलात्कार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकार आणि रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटले जाते. तिथं एका मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुणाच्या घरावरील कौले जरी उडवली गेली तरी एका अभिनेत्रीवर तेव्हा अन्याय झाला असे म्हटले जाते. आता रामदास आठवले कुठं आहेत ? असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

अभिनेत्री कंगना राणावतचे कार्यालय पालिकेने तोडल्यानंतर कंगनावर अन्याय झाला अशी भूमिका रामदास आठवले यांनी घेतली होती आणि पालिकेवर निशाणा साधला होता. त्यांनी कंगनाची भेट घेत तिला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देखील दिले होते. त्यानंतर कंगनाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. या पार्श्वभुमीवर संजय राऊतांनी रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांची युपीबाबत भूमिका काय ? त्यांनी तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करवी असे राऊत म्हणाले. वेगळ्या राज्यात अशा घटना घडतात, तेव्हा आवाज उठतो मग आता का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही शांतपणे याकडं पाहतोय. संधी मिळेल तेव्हा आवाज उठवेन असे राऊत म्हणाले. दरम्यान, रामदास आठवले यांनीही आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिर्डीत ड्रेसकोडवरुन वातावरण तापलं, फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई आज शिर्डीत

News Desk

समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे सक्षमीकरण आवश्यक! – चंद्रकांत पाटील

Aprna

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; कठोर कारवाई न करण्याचे राज्य सरकारला आदेश

News Desk