HW News Marathi
महाराष्ट्र

हिंमत आहे का दंगल करण्याची? इथे ठाकरे सरकार आहे; संजय राऊतांचा इशारा

मुंबई | मुंबईतील मालाड येथे क्रीडा संकुल तयार करण्यात आले असून त्याला टिपू सुलतान हे नाव देण्यात आल्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. मात्र, यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलन केले होते. तसेच अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली आहे. तर दुसरीकडे यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनीही भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी टिपू सुलतानचं गुणगान गात गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने राष्ट्रपतींचा राजीनामा घ्यावा, अशा शब्दात राऊतांनी भाजपला फटकारलं आहे.

संजय राऊत यांनी आज (२७ जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरुन भाजपने केलेल्या निषेधाविषयी विचारण्यात आले. त्यावर राऊत म्हणाले, “आम्हाला इतिहास कळतो. तुम्ही इतिहासाचे ठेकेदार नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने इतिहास बदलता, लिहिता, दिल्लीत स्वत:चा इतिहास कसा लिहायला घेतला हे आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतान, हैदर अली, श्रीरंगपट्टणम, मैसूर राज्य सर्व आम्हाला माहीत आहे. टिपू सुलतानने काय अत्याचार केले, ब्रिटिशांविरोधात कसा लढा दिला हे आम्हाला माहीत आहे. ते भाजपने सांगायची गरज नाही”, असं राऊत म्हणाले.

दंगल करून दाखवाच

भाजपा नेते राज पुरोहित यांनी अस्लम शेख यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून त्याबद्दल राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, “तसं असेल तर मग सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल. कर्नाटकाच्या विधानसभेत राष्ट्रपतींनी टिपू सुलतानचं गुणगान गात गौरव केला होता. त्यावेळी टिपू सुलतान यांना योद्धा, ऐतिहासिक योद्धा, स्वातंत्र्यसैनिक अशा उपाध्या त्यांनीच लावल्या आहेत. त्यामुळे सर्वात आधी भाजपाने त्यांचा राजीनामा घ्यावा”, असं राऊत म्हणाले. तसेच या या नामकरणावरून राज्यात दंगली होतील का असं पत्रकारांनी विचारलं असता राऊत म्हणाले, कोण करणार दंगली? हिंमत आहे का? जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी दंगल करून दाखवाच. इथे ठाकरे सरकार आहे, असा इशारा राऊत यांनी यावेळी दिला.

पेटवापेटवीमध्ये महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण सर्वांना ठाऊक 

पुढे ते म्हणाले, टिपू सुलतानच्या मुद्यावर आंदोलन करून राज्य पेटवण्याची भाषा भाजपच्या तोंडी असेल तर पेटवापेटवीमध्ये महाराष्ट्रात एक्सपर्ट कोण आहेत, हे पण सर्वांना माहीत आहे, असेही संजय राऊतांनी म्हटले आहे. तसेच टिपू सुलतानच्या नामकरणाचे काय करायचे यासाठी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकार समर्थ असल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

swarit

शिवसेना-भाजपची खरंच युती होणार का? संजय राऊतांनी दिलं ‘हे’ उत्तर!

News Desk

करुणा शर्मांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी!

News Desk