HW News Marathi
देश / विदेश

सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय? राऊतांचा केंद्राला सवाल  

नवी दिल्ली | केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यावरुन शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. देशात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना राणावत या प्रकरणी भाष्य केले आहे. देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवलं जात आहे. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट करण्यात येत आहोत. दिल्लीच्या सीमांवर सुरु असणारं आंदोलन फक्त तीन राज्यांचं राहिलेलं नाही देशातील सर्व शेतकऱ्यांचं आंदोलन झालं आहे, अशी आक्रमक भूमिका संजय राऊत यांनी राज्यसभेत मांडली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत.त्यांच्याबद्दल आमच्या सर्वांना आदर आहे. केंद्र सरकारला देशानं बहुमत दिलं आहे. पण,बहुमत अहंकारानं चालत नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. ही बाब देशासाठी चांगली बाब नाही. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पंतप्रधानांसह सर्वांना दु:ख झालं आहे. लाल किल्ल्यावर अपमान करणारा दिप सिद्धू कोण आहे, तो कोणाचा माणूस आहे. तो सिद्धू आतापर्यंत पकडला गेला नाही. मात्र,२०० पेक्षा जास्त शेतकरी आंदोलक पकडले गेले आहेत. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. १०० युवा शेतकरी आंदोलक कुठं आहेत.पोलिसांनी त्यांच्यासोबत काय केलय हे सांगावं, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑपरेशन लोटस | भाजपकडून काँग्रेसच्या अनेक आमदारांना पक्ष सोडण्यासाठी २५ कोटी रुपयांची ऑफर

News Desk

काश्मीरमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीन संघटनेच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

पीएनबी घोटाळा प्रकरणी मेहुल चोकसीच्या सहकाऱ्याला कोलकात्याहून अटक

Gauri Tilekar