HW News Marathi
महाराष्ट्र

“विधानसभा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, शिवसेना मंत्र्याचं विधान

मुंबई | काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींमुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे, एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेत्यांच्या नावांची रांग सुरू झाली असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा दिला आहे. पटोलेंच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती आहे. त्यातच शरद पवारांनी केलेल्या विधानामुळे आघाडीतला अविश्वास वाढवण्याची शक्यता आहे.

अशात शिवसेना मंत्री उदय सामंत यांनी राज्यात मंत्री कोण होईल, विधानसभा अध्यक्ष कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवतील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे असं विधान करून काँग्रेस-राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद

News Desk

नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम, मानसोपचाराची आवश्यकता, प्रवीण दरेकरांची टीका

News Desk

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दयावर सलग तिस-या दिवशी ही कामकाज ठप्प

News Desk