HW News Marathi
महाराष्ट्र

देशाच्या स्वातंत्र्याला फोन टॅपिंगमुळे धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा!

नवी दिल्ली | केंद्रीय अधिवेशनाला आज(१९ जुलै) सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे मांड्यात येणार आहेत असं दिसून येतंय. परदेशी कंपन्या आणि ॲपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तसेच या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

१५०० हून अधिक लोकांचे फोन टॅप

देशात अजून एक चिंताजनक घटना घडल्याचा खुलासा झाला आहे. देशातील राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा १५०० हून अधिक लोकांचे फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे परदेशी कंपन्या आणि ॲपने हे फोन टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावं समोर आली आहेत. अजून बरीचशी नावं समोर यायची आहे. यावेळी पत्रकारांचे सर्वाधिक फोन टॅप झाले. संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणं गरजेचं आहे. काही परदेशी कंपन्या, परदेशी अॅप अशा प्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकत असतील तर या देशातील स्वातंत्र्याला सर्वात मोठा धोका आहे, असं राऊत म्हणाले आहेत.

कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो

राजकारणात विरोधी पक्ष नेहमीच एकमेमकांच्या त्रुट्या काढत असतात. असाच टोला संजय राऊत ह्यांनी सरकारला लगावला आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत. सरकारला ज्या पद्धतीने समोर येऊन या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा. ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचं वातावरण आहे, अशी टीका त्यांनी केली. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांचा फोन टॅप झाला तर नवल वाटणार नाही

महाराष्ट्रात सरकार बनत असताना त्याआधी फोन टॅपिंग करण्यात आली होती. फोन टॅप करणारे आमचेच म्हणजे महाराष्ट्रातील होते. त्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडलं. त्यावर चौकशी लावली. महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी या फोन टॅपिंगमध्ये होते, त्याची चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे फोन टॅप कोणी करत असेल तर आश्चर्य वाटणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

नको ‘त्या’ गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न, अजित पवारांची पंतप्रधानांवर टीका

Aprna

“समीर वानखेडेला आव्हान देतो, वर्षभरात नोकरी जाईल”, नवाब मलिक यांचा दावा!

News Desk