HW News Marathi
देश / विदेश

बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल – संजय राऊत

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.२४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी सुरु आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह ३७३३ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणूकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होण्यास हरकरत नाही, असं संजय राऊत बिहार निवडणुकांबाबत बोलताना म्हणाले आहेत.

‘बिहारमध्ये ३१ वर्षांच्या तरुणाने देशातील भल्याभल्यांना आव्हान दिलंय, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु व्हायला हरकत नाही. निकाल हाती आल्यानंतर जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या कलांबाबत दिली.

संजय राऊत म्हणाले की, ‘बिहार निडवणुकांचे निकाल अद्याप जाहिर झालेले नसले, तरी जे काही कल येत आहेत, त्यावरून एका तरूण नेत्यानं देशाच्या केंद्रीय सत्तेला, भल्या भल्या नेत्यांना आव्हान देऊन सर्वांसमोर एक ताकद उभी केली आहे. ज्याप्रकारे टक्कर तो देत आहे. याक्षणी कांटे की टक्कर सुरु आहे. पण मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरु होण्यास हरकरत नाही.’

‘बिहारचा प्रचार जो आहे. हा पंतप्रधान मोदी, नितीश कुमार आणि भाजपचे इतर प्रमुख नेत यांनी केला. पण तो जंगलराज भोवतीच फिरत राहिला. खरं म्हणजे, १५ वर्ष कोणाचं जंगलराज होतं, हा तिथल्या लोकांना पडला होता. पण जेव्हा संपूर्ण निकाल हातात येतील, दुपारी 12 नंतर त्यावेळी लोकं जंगलराज विसरलेली असतील आणि मंगलराज सुरु झालेलं असेल,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बंगळूरुमध्ये लढाऊ विमानाचा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

News Desk

काँग्रेस उमेदवार अलका लांबांनी ‘आप’च्या कार्यकर्त्याला कानशिलात लगावली

swarit

आज ठरणार शबरीमाला याचिकेवरील सुनावणीची तारीख

swarit