HW News Marathi
देश / विदेश

BiharElection |…म्हणून जेडीयूने निकालांपूर्वीच मानली हार

पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजप प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे.

“लोकांनी जो कौल दिला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण कोरोनामुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या ७० वर्षात बिहारची जी अधोगती झाली, त्याची किंमत आम्ही चुकवत आहोत” असे जनता दल युनायटेचे नेते के.सी.त्यागी म्हणाले आहेत.

भाजपा आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत असले तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती. सध्याचे जे कल आहेत, त्यानुसार भाजपा जेडीयूपेक्षा बराच पुढे आहे. जेडीयूच्या खराब प्रदर्शनाचा एनडीएला फटका बसला आहे. नितीश कुमार यांनी सलग चौथ्यांदा सत्तेसाठी बिहारच्या जनतेकडे कौल मागितला होता. नितीश कुमार यांना नोकऱ्या, करोना व्हायरसची हाताळणी, स्थलांतरीत मजुरांचे प्रश्न या मुद्यांवरुन जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#26/11Attack : २६/११ च्या कटू आठवणी, असा झाला होता दहशतवाही हल्ला…

News Desk

केरळच्या पुरग्रस्तांना आप’ची अर्थिक मदत

News Desk

Ayodhya land dispute case: सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्टपासून नियमित सुनावणी

News Desk