HW News Marathi
महाराष्ट्र

कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही – संजय राऊत

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यावरुन राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कोर्टाच्या निकालावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कायदेशीर बाब आहे, हे प्रकरण न्यायालयाच्या अख्यारित आहे. कोर्टाच्या निकालावर मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्याचे महाधिवक्ता बोलू शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

“महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, न्याय आणि संघर्ष करणारं राज्य आहे. राज्याने कधी कोणावर अन्याय केला नाही. संपूर्ण निकाल हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे योग्य नाही. मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभं करणे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांची बदनामी आपल्याच राज्यातील नेते करत असतील तर ते राज्याचं खच्चीकरण आहे”, असे त्यांनी सांगितले

तसेच, “सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. विरोधक या निर्णयानंतर गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत त्यावर ते बोलण्यास सक्षम आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकावर शंका घेणे म्हणजे ज्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, आणि ज्यांनी देशाची घटना लिहिली त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. जर हे सगळं ठरवून होत असेल तर त्याला राज्य सरकार काय करणार”,असेही संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यासह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा 

News Desk

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग! सिंदखेडराजाजवळ निर्माणाधीन उड्डाणपुल कोसळला

Aprna

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अनिल परब घेणार पुन्हा बैठक!

News Desk