HW News Marathi
महाराष्ट्र

बजेटमध्ये महाराष्ट्र दिसत नाही, अर्थसंकल्पात थापा मारणं बंद करावं – संजय राऊत

 

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काही आळे नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. “अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधावा लागतो. महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे. राज्यानं देशाला सातत्यानं देण्याची दानत दाखवली आहे. महाराष्ट्र देशाचं पोट भरतो पण राज्याकडं कोण पाहत नाही. राष्ट्रीय कोशातून निवडणुकांसाठी निधी वाटप सुरु आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत? किती खोटे आहेत? हे सहा महिन्यात कळेल.” अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

” देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र दिसत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा हा महाराष्ट्रातून विशेष करून मुंबईतून मिळणाऱ्या महसूलावर टिकून असतो. पण सर्वाधिक निराशा ही महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राचं देणं लागतं. त्या संदर्भात काही आहे काय? दोन शहरांना तुम्ही मेट्रोचा गुळ लावलेला आहे. पण जी मेट्रो केंद्र सरकारने मुंबईत अडकवून ठेवली आहे. त्या विषयी कुणी बोलायचं? असे अनेक विषय आहेत. तुमच्या खिशात काही आहे का? तुमच्या खिशात काही नाही. मराठीत एक म्हण आहे, खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे दिल्लीचे बाजीराव हे देशाला वाटत चालले आहेत, पण आहे का आपल्याकडे? बघा जरा. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला सातत्याने देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र कायम अन्याय होत आलेला आहे. अन्याय म्हटल्या पेक्षा महाराष्ट्र देशाचं पोट भरतो, पण महाराष्ट्राच्या पोटाकडे कुणी पाहत नाही.” असं देखील यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

”अर्थमंत्री जे आकडे मांडत आहेत, त्या आकड्यात आम्हाला फार पडायचं नाही. ते आकडे वर्षानुवर्षे येतच असतात. ते किती खरे असतात, किती खोटे असतात हे सहा महिन्यांनी कळतं. आता काहीजण या अर्थ संकल्पाचा अभ्यास करत असतील, त्यातून काही काढतील. पण मला असं वाटतं की, थोडं अर्थसंकल्पामध्ये तो कुणाचाही असो आर्थिक थापा मारणं हे बंद केलं पाहिजे. सामान्य माणसाला केवळ भूकेची व पोटाची भाषा कळते, तरूणांना रोजगाराची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत जर तुम्ही अर्थसंकल्प सांगितला किंवा मांडला व त्यातून काही कृती झाली. तर त्या अर्थसंकल्पाची आम्हाला पाठ थोपटता येईल.” असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद केली?

महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या अर्थसंकल्पाचे स्वागतही केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानी एजन्ट आणि जागतीक पातळीवरील घोटाळेबाजासोबत बेसच्या ई बसचा व्यवहार! – आशिष शेलार

Aprna

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

News Desk

मनसेच्या पुढाकाराने नांदेड -पनवेल एक्सप्रेस गाडी कर्जतला थांबणार

swarit