HW News Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, संजय राठोडांबाबत योग्य तो निर्णय घेतील!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय नेते आहेत. ते मिस्टर सत्यवादी आहेत. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरणात ते संपूर्ण सत्य जाणून घेऊन योग्य तो निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने लोकशाहीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

ते आज (२७ फेब्रुवारी) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, लोकशाहीत विरोधकांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मात्र, कोरोनाच्या काळात प्रत्येकाने लोकशाहीच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याशिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊच देणार नाही, या विरोधकांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. विरोधकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अधिवेशन होऊनच द्यायचं नाही, ही आडमुठी भूमिका लोकशाहीच्या विरोधात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले की, “पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काही डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार.”

चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी.”

संजय राऊत हे चित्रा वाघ यांना सल्ला देताना म्हणाले की, “या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर त्यांनी अशा पत्रकार परिषदा घ्याव्यात. या अशा प्रकरणांचा प्रसिद्धीसाठी कोणीही वापर करु नये.” संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडलं आहे. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, “आंदोलन करु नये अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी, न्यायासाठी लढणारी अशी आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेतून सोडवावा. या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न विचारावेत.”

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या प्रश्वावर संजय राऊतांनी आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अधिक माहिती असेल असंही त्यांनी सांगितलं.पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करावे, व्यापाऱ्यांची शरद पवारांकडे निवेदनाद्वारे मागणी

News Desk

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

“अक्षयतृतीया आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका,” राज ठाकरेंचे ट्वीट करत कार्यक्रर्त्यांना आवाहन

Aprna