HW News Marathi
महाराष्ट्र

“महाराष्ट्रात आज भाजप जो काही आहे त्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जातं” – संजय राऊत  

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज (२३ जानेवारी) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते असा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग ३० वर्ष बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असं वक्तव्य केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिलं, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावं लागेल, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये आज जो भारतीय जनता पक्ष आहे याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना जातं. आज ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष बळकट आहे तो बाळासाहेब ठाकरेंमुळेच हे म्हणायला राऊत विसरले नाहीत.

मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस ५० वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी अनेक घाव सोसले. आमच्या शिवसैनिकांना त्यांनी घडवलं. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी, नारायण राणे हे मुख्यमंत्री करुन दाखवलं.

काँग्रेस पक्ष त्यावेळी सत्तेत होता, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्यामुळेच मनोहर जोशी आणि नारायण राणे हे दोन शिवसेना नेते मुख्यमंत्री झाले, असं राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेनं युती केली नसती तर भाजप महाराष्ट्रात गावागावात पोहोचलं नसतं. भाजपला जे शिवसेनेवर जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. आम्ही अटल बिहारी वाजपेयींना आणि लालकृष्ण आडवाणी यांना भाजप विसरलं, असं आम्ही म्हणत नाही. राम मंदिराची लढाई बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात लढली. बाळासाहेब ठाकरे यांनी लेखणी आणि वाणीतून सत्तापरिवर्तन करुन दाखवलं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दर्जेदार रस्ते व पुलांमुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार! – नितीन गडकरी

Aprna

राजू शेट्टींना सत्तेची ऊब लागली – राधाकृष्ण विखे-पाटील

News Desk

अभिनेते किरण मानेंना गैरवर्तनामुळे मालिकेतून काढल्याचे वाहिनींने दिले स्पष्टीकरण

Aprna