HW News Marathi
महाराष्ट्र

“अरे बापरे मला भीती वाटतेय…पण सामना वाचायला लागलात चांगली गोष्ट आहे!”

मुंबई | पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचा ‘सामना’ रंगताना दिसत आहे. भाजपकडून होत असलेल्या आरोपांना शिवसेनेच्या नेत्यांसह सामनातूनही प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसत आहे. सामनातील लिखाणाबद्दल, भाषेबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून, त्याबद्दल संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं. पाटील यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केलं आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सामनातून होणाऱ्या लिखाणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. सामनातून गलिच्छ भाषा वापरली जाते. याबद्दल आपण संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याचं पाटील म्हणाले होते. त्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींना राऊत यांना प्रश्न केला.राऊत म्हणाले की,”अरे बापरे… ताबडतोब… लगेच. मला आता त्यांची भीती वाटतेय…ते पत्र लिहतायेत.. वा वा. सामना वाचतात. सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सकारात्मक नजरेतून महाराष्ट्र आणि देशाकडे बघतील. सामना वाचत राहिले, तर त्यांचा विश्वास बसेल की, पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,” असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत आहे. या मुद्यावरून भाजपाकडून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे. या औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना राऊत म्हणाले,”औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. त्याला तीस वर्ष झाली आहेत. आता फक्त कागदावर बदलायचं आहे. महाविकास आघाडीत हा मतभेदाचा विषय नाही. एकत्र बसले, तर मुद्दा निकाली निघेल,” असं राऊत यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार | मुख्यमंत्री

News Desk

नाणार जमीन अधिग्रहण अधिसूचना रद्द | सुभाष देसाई

News Desk

नागरिकांकडे राशन कार्ड नसेल तर आधार कार्ड ग्राह्य धरावे, फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी

swarit