HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला – संजय राऊत

नवी दिल्ली | “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पलटवार करत उत्तर दिले आहे. ब्राह्मण असल्याने आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान टार्गेट केल्याचा आरोप फडणवीसांनी सरकारवर केला होता.

“महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्राने मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्याक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला” याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. संजय राऊतांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी शेतकरी विधेयक आणि इतर विषयांवर दोघांची चर्चा झाल्याची माहिती आहे.

“अकाली दल एनडीएतच आहे, ते बाहेर पडले असे आपण म्हणू शकत नाही. त्यांनी फक्त शेतकरी विधेयकावरुन मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संवाद थांबल्याचा हा परिणाम आहे. संवाद राहिला असता तर शिवसेनेलाही मजबुरीने बाहेर पडावं लागलं नसतं, पण तो इतिहास झाला” असेही राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा उपलब्ध करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दावा

News Desk

‘त्या’ चार कंपन्यांची राज्यात होणारी गुंतवणूक परकीय

Aprna

सचिन वाझेला सेवेत रुजू करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीची मुंबई पोलिसांनी माहिती द्या

News Desk