HW News Marathi
देश / विदेश

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे संशोधन नाही, राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा काल (२७ जुलै) वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंसारखं नेतृत्व राष्ट्राला हवं असल्याचं म्हटलं होतं. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर आणि त्यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा आता संजय राऊतांनी समाचार घेतला आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही

संजय राऊतांनी आज (२८ जुलै) प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंचं राष्ट्रीय नेतृत्व मान्य आहे का?, असं देवेंद्र फडणवीस म्हणाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला. कोण काय बोलतंय याला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. मी काय बोललो ते समजून घ्या आधी. या देशात एकापेक्षा जास्त नेते असू शकत नाही का? भाजपच्या काळात अटलबिहारी वाजपेयी होते, लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. प्रमोद महाजन होते. बाळासाहेब ठाकरे होते. अनेक मोठे नेते देशात काम करू शकत नाही का? भाजपने राजकारणाचा आणि राजकीय घडामोडींचा नीट अभ्यास करून बोलावं. अशी माझी त्यांना विनंती आहे. कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास आणि संशोधन नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

प्रादेशिक पक्षांनीही राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केलं

या देशात राज्याचा मुख्यमंत्री जो कोणी असतो तो राष्ट्रीय नेताच असतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर घेतलं जात होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्व देशातील विरोधी पक्षनेते फार अपेक्षेने पाहतात. ममता बॅनर्जींकडेही पाहतात. शरद पवार तर या सर्वांच्या वर आहेत, असं त्यांनी सांगितलं. कधी तरी भाजपचे दोन खासदार निवडून आले होते. आज पाच पंचवीस झाले. आज आमचे 18 खासदार आहेत. अनेकदा प्रादेशिक पक्षाचे लोकं सुद्धा दिल्लीतून नेतृत्व करताना पाहिलं आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

पवार राजकारणातले भीष्म पितामह

पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज भेटत आहेत. पवार अनेकांना भेटत असतात. पवारांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह म्हणून पाहतो. सर्वांना एकत्र करण्याची क्षमता आणि ताकद आणि संवादाची कसब पवारांकडे नक्कीच आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मदतीसाठी जोर लावावा लागेल

केंद्र सरकारने काल राज्याला मदत जाहीर केल्याचं संसदेत सांगितलं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मागच्या वर्षाची मदत आता मिळाली असेल तर या वर्षीच्या मदतीसाठी सर्व पक्षाच्या खासदार आणि केंद्रातील मंत्र्यांना जोर लावावा लागेल. ही तातडीची मदत आहे, असं मला मंत्र्यांच्या बोलण्यातून कळलं, असं ते म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही”, फडणवीसांचा राऊतांना टोमणा

राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही

शिवसेनेच्या संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी राष्ट्रीय नेता व्हावं, असं म्हटलं. असं वाटत असेल ते चांगलंच आहे. तर उद्धव ठाकरेंनी नक्की मोठं व्हावं, असं फडणवीस म्हणाले. तर राऊतांना टार्गेट करत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षाही मोठं नाही, असं राऊतांना वाटतं,अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणविसांच्या ठाकरेंना शुभेच्छा

मुख्यमंत्र्यांना मी फोन करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना जी संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची जास्तीत जास्त सेवा करावी, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय राऊत यांचं ट्विट

तर दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असं ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे आता राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अखंड साथ. अतूट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्राला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची गरज

दरम्यान, राऊत यांनी सकाळीच मीडियाशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकाला आपला कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे. घरातला माणूस नेतृत्व करतो, असं प्रत्येकाला वाटतं. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टिकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदुत्वावादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो, असं ते म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळमध्ये एका दिवसात पावसाचे १०६ बळी

News Desk

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर गिरीश कर्नाड रडावर

News Desk