HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांवरील छापेमारीत राजकीय सुडबुद्धीचा प्रकार नसावा, राऊतांचे मत

मुंबई | राज्याच्या राजकारणात आज (२४ एप्रिल) सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरासह इतर १० ठिकाणी सीबीआयने छापे मारले आहेत. तसेच, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सकाळपासून मुंबई, नागपूर अशा एकूण १० ठिकाणी सीबीआयचे अधिकारी पीपीई किट घालवून छापेमारी करत आहेत. तर दुसरीकडे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहेत. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू, असं संजय राऊत म्हणाले आहेत. आज प्रसारमाध्यमांशी तो बातचीत करत होते. सीबीआयला हायकोर्टाने काही सूचना केल्या आहेत त्यानुसार सीबीआय काम करत असेल असं मला वाटतं. यामध्ये राजकीय सुडबद्धीचा प्रकार नसावा, असं मतही यावेळी संजय राऊत यांनी मांडले आहे.

सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईसह नागपूरमध्येही सीबीआयची छापेमारी सुरु

दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

“राजकीय हेतूने ईडी, सीबीआयचा वापर”, हसन मुश्रीफांचा भाजपवर गंभीर आरोप

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या एक पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी करत राष्ट्रवादी पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडी,सीबीआय यांचा राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून वापर होत असल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज झालेल्या सीबीआय छापेमारीवरून त्यांनी हा निशाणा साधला आहे.

मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणताही पुरावा नसताना सीबीआयने ही कारवाई सुरू केली आहे. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे कारस्थान भाजपने रचले आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील. अंबानी याच्या घरासमोरील स्फोटके प्रकरणातून परमवीर सिंग यांना माफीचा साक्षीदार बनवण्यासाठी धडपड सुरू आहे. दूध का दूध और पाणी का पाणी लवकर होईल, असे देखील मुश्रीफ म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

News Desk

परमबीर सिंहांच्या दोन पोलीस निरीक्षकांना CID कडून अटक

Gauri Tilekar

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Aprna