HW News Marathi
महाराष्ट्र

एका नटीचा एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला – सामना

मुंबई | उत्तरप्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या सामुहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश हादरला. त्या मुलीचा दुर्देव मृत्यू झाला. ‘बेटी बचाव’च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार आणि हत्या झाली. हिंदू मुलींना पळवून बलात्कार आणि हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करुन जाळला जातो, अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या रोखठोक सदरातून याबाबतचा लेख प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात कंगना रनौतसह भाजपवर टीका करण्यात आली आहे.

काय लिहिले आहे अग्रलेखात?

ती – ड्रग्ज घेत नव्हती. ती – स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती. ती – झोपडीत राहत होती आणि तिने कोटय़वधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते. तिचे कोणाबरोबर ‘अफेयर’ नव्हते. ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही! असा टोलाही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

“बलात्कारपीडित महिलेचे नाव समोर आणू नये हे संकेत आहेत. पण ते तिच्या इस्पितळातील छायाचित्रांसह समोर आले आहे. हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्म्ये उभे राहिले. ते हाथरस बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य झाले. या सर्व प्रकारात अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत.

“महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघड्यावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भाजपचेराज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढय़ात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती.

राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना राणावत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला.” असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांतदादा, दैदिप्यमान कामगिरीमुळेच तुम्हाला कोल्हापूर सोडून…”,रुपाली चाकणकरांनी डिवचलं

News Desk

परत जायचंच होतं तर आलात कशाला पुणेकरांनी बोलवालंही नव्हतं, पवारांचा पाटलांना सणसणीत टोला

News Desk

मंत्रालयात दारूच्या बाटल्या, प्रवीण दरेकर, चित्रा वाघांची राज्य सरकारवर जोरदार टीका!

News Desk