HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकार आल्यापासून कोणावरही सुडाच्या भावनेने कारवाई नाही, अर्णब यांच्या अटकेवर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी आज (४ नोव्हेंबर) अटक केली आहे. त्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रात आणीबाणीची वेळ आणत असल्याचा आरोप राज्य सरकारवर करण्यात आला. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी गुन्हा केला असेल आणि पोलिसांनी त्याबद्दल माहिती मिळाली असेल तर ते त्यांचे काम करत आहेत. यात कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

“महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य, इथं सगळं कायद्यानं चालतं, मुंबई, महाराष्ट्र पोलिस कुणावर अन्याय करत नाही, सूड उगवत नाही, मुंबई पोलिसांच्या कारवाईशी राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही. पोलिसांकडे तपासादरम्यान काही पुरावे हाती लागले असतील तर पोलिस कुणावरही कारवाई करु शकतात, राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदलाच्या भावनेतून कारवाई नाही, या चॅनेलने राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले, त्यावरही कारवाई व्हावी”.

“पोलिसांकडे तपासादरम्यान काही पुरावे हाती लागले असतील तर पोलिस कुणावरही कारवाई करु शकतात, राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही बदलाच्या भावनेतून कारवाई नाही, या चॅनेलने राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले, त्यावरही कारवाई व्हावी. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळाव्या, आम्ही पत्रकार आहोत, पत्रकारितेसाठी हा काळा दिवस असल्याचं मला वाटत नाही”, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

swarit

पवारांनी ‘या’ निमित्ताने आपल्या पक्षात आत्मचिंतन घडवावे !

News Desk

…तर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, पंकजा मुंडेंचं सुचक वक्तव्य

News Desk