HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मुंबई विरोधात बोलणाऱ्या लोकांची पुढची पावले राजकारणाचीच!

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि मुंबई विरोधात बोलणाऱ्या लोकांवर तोफ डागली आहे. जे जे लोक मुंबई, महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत, त्यांचं पुढचं पाऊल राजकारणाचंच आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी सुनियोजित असे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.कंगना राणावतच्या कार्यालयाचे बांधकाम तोडण्यात आले. या प्रकरणातली सुनावणी आज (२३ सप्टेंबर) हायकोर्टात होणार आहे.

दरम्यान, कंगनाने मुंबई महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात संजय राऊत आणि तोडफोडीचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याला प्रतिवादी बनवण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी, महाराष्ट्र आणि मुंबईला बदनाम करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा दिला. यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, जे जे लोक मुंबई आणि महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत, त्यांचं पुढचं पाऊल राजकारणाचं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, विनायक राऊत यांनी केली मागणी

News Desk

“कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा”

Aprna

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

News Desk