HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी राबविली जाणार १ लाख सौर कृषी पंप योजना

मुंबई | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ लाख सौर कृषी पंपाची योजना ३ वर्षात राबविण्यात येणार आहे. १ लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. या योजनेसाठी सरकार ८५८.७५ कोटी रुपये खर्च करणार आहे. एक लाख सौर कृषी पंपाच्या नवीन योजनेला राज्याच्या मंत्रीमंडळाने आज (मंगळवार) मंजूरी दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

१ लाख सौर कृषी पंपाची ही योजना २०१८ ते २०२१ या तीन वर्षात राबविली जाणार आहे. पहिल्या वर्षी २५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार तर तिसऱ्या वर्षी २५ हजार या प्रमाणे शेतकऱ्यांना १ लाख कृषी पंपाचा लाभ घेता येणार आहे. ही योजना राबविताना अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सौर पंपासाठीचा खर्च विशेष घटक योजना व आदिवासी उपयोजनेतून खर्च केला जाणार आहे. २०१७-१८ मध्ये महावितरण कंपनीला सरकारकडून ४८७० कोटी रुपये अनुदान देण्यात आाले आहे.

ज्या शेतकऱ्यांनी सौर पंप बसविण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार आणि महावितरण कर्ज काढून शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे, असे शेतकरी पात्र राहणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देणार?

swarit

खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई होणार

swarit

आमचे गरिबांचे सरकार, गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा तीन चाकी रिक्षाच परवडते !

News Desk