HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलचा शेवटचा पेपर रद्द

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा भूगोलाचा शेवटचा पेपर रद्द केल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर नववी आणि अकरावीची पेपर देखील रद्द केल्याची माहिती आज (१२ एप्रिल) दिला आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहा २१ मार्च रोजी वर्षा गायकवाढ यांनी दहावीचा २३ मार्चला होणार पेपर पुढे ढकलल्याची माहितीत वर्षा गायकवाड यांनी दिली होती. हा पेपर पुन्हा कधी होणार याबाबतची घोषणा ३१ मार्चनंतर केली जाणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी त्यावेळी दिली होती. यानंतर आज दहावीचा शेवटा पेपर आणि नववी आणि अकरावीचा पेपर रद्द केल्याची माहिती दिली.

आधीही १ली ते ८ वीच्या मुलांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून ९वी आणि ११वीच्या परीक्षा लवकरच घेण्यात याव्या याकडे शिक्षणमंत्री आणि शाळाही लक्ष देत आहेत. दरम्यान, सीबीएसई बोर्डाने यापूर्वीच दहावी, बारावीच्या १९ ते ३१ मार्च दरम्यान होणाऱ्या परीक्षा रद्द केल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सिंग यांचे पत्र कोणाला खुश ठेवण्यासाठी आहे त्याचं मी नाव घेणार नाही”, जयंत पाटील यांचं मोठं विधान

News Desk

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार! – मुख्यमंत्री

Aprna

शेतकऱ्यांसाठी मनसेचा उद्या ठाण्यात मोर्चा

News Desk