HW News Marathi
महाराष्ट्र

“सिंग यांचे पत्र कोणाला खुश ठेवण्यासाठी आहे त्याचं मी नाव घेणार नाही”, जयंत पाटील यांचं मोठं विधान

सांगली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख य़ांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. पण ‘अनिल देशमुख हे चांगले काम करत असून राजीनामा घेण्याचा कोणताही निर्णय नाही’ असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबद्दलचे वृत्त फेटाळून लावले आहे.

‘दिल्लीमध्ये शरद पवार यांनी बोलावलेली बैठक ही नियोजित होती. महाराष्ट्रात काहीही झालं की विरोधक सरकार बरखास्त करा अशी मागणी करत असतात. आता ते हळूहळू हास्यास्पद होऊ लागले आहे. अनिल देशमुख चांगले काम करत आहे. त्यांच्या राजीनाम्याबद्दल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. योग्य तो तपास सुरू आहे’, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

‘कोण अधिकारी आहे, खोलात जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे कुणी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात कोण जबाबदार आहे, मुंबईमध्ये स्फोटकांनी भरलेली कार कुणी ठेवली आहे याचा तपास सुरू आहे. यातूनच परमबीर सिंग यांचे पत्र आले आहे’ असंही जयंत पाटील म्हणाले.

तसंच ‘कुणाला तरी खूश करण्यासाठी ते पत्र आहे. यात मी कुणाचे नाव घेणार नाही. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक जण या प्रसंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर जी माहिती बाहेर येत आहे. ती प्रसारमाध्यमातून दिसत आहे. त्यावरून पोलीस अधिकारीच यामध्ये सहभागी होते असं दिसून आले आहे. त्यामुळे कितीही मोठा अधिकारी असला तरी ते खपवून घेतले जाणार नाही, हे आम्ही ठरवलं आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी पाठपुरावा केला आहे, त्यामुळे हे पत्र समोर आले आहे’ अशी टीकाही पाटील यांनी केली.

‘जी व्यक्ती १७ वर्ष सेवेत नव्हती. निलंबित होती, त्या काळात ती व्यक्ती कोणत्याही पक्षाला किंवा व्यक्तीला भेटली असेल. पण सचिन वाझे आणि शिवसेना असा संबंध जोडण्याचे कारण नाही. एखादा अधिकारी सेवेत आला की तो महाराष्ट्राचा सेवक होतो. त्यामुळे अशा अधिकाऱ्याला सेवेत कुणी घेतली हे आता समोर आले आहे, असंही पाटील म्हणाले.

शरद पवारांनी बोलावली दिल्लीत बैठक

शरद पवार हे सध्या दिल्लीत आहेत.परमबीर सिंग पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार यांनी दिल्लीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील यांना दिल्लीतच बैठकीसाठी बोलावून घेतले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्रिपद बदलण्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होणार असून आज सायंकाळी ७ वाजता ही बैठक होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ अपक्ष आमदाराचा शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा

News Desk

“…नाही तर सामुदायिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या”, MPSC च्या विद्यार्थ्यांचा निर्वाणीचा इशारा

News Desk

राज्यातील आशा वर्कर्सचा संप मिटला, राजेश टोपेंच्या बैठकीत निघाला तोडगा

News Desk