HW News Marathi
महाराष्ट्र

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये युतीवर लवकरच शिकामोर्तब होणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्या अखेर सुटल्याची माहिती सूत्रांकडून माहिती आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागांवर लढण्याची शक्यता वर्तविण्या येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप प्रत्येकी १४४ जागा लढण्याचा फॉर्म्युला ठरल्याचे निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. युतीबाबत येत्या दोन तीन दिवसांत भाजपध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवर येऊन युतीसाठी बोलणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी(१४ फेब्रुवारी) रात्री मातोश्रीवर जाऊन लोकसभा निवडणुकीतील भाजपा-शिवसेना युतीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. या बैठकीत जागावाटपाचा निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपने पालघरच्या जागेवर पाणी सोडत शिवसेनेला ठरविले आहे.
दरम्यान २०१४साली केंद्रात भाजपला एकहाती सत्ता आल्यानंतर मित्र पक्षांना म्हणजे शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली गेली. तसेच राज्यात सातत्याने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याची घेतलेली भूमिका भाजपने घेतल्यामुळे दुखावलेल्या सेनेने आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंपासून सर्वच शिवसेना नेत्यांनी आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला. मात्र भाजप नेत्यांनीही युती होणार असा विश्वास वारंवार व्यक्त केला होता. त्यामुळे येत्या काही दिवसात युतीची घोषणा झाली तर या युतीबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

News Desk

अनिल देशमुखांना १०० दिवस ED कस्टडी अन् जेलमध्ये रहावे लागेल- किरीट सोमय्या

News Desk

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर विधानपरिषदेवर जाणार का? संजय राऊतांनी दिले उत्तर…

News Desk