HW News Marathi
महाराष्ट्र

संभाजी निलंगेकरांकडून ७६ कोटीचे कर्ज अवघ्या २५ कोटीत सेटलमेंट

उस्मानाबाद | राज्याचे कामगार कल्याण मंत्री संभाजी निलंगेकर यांनी २०१५ मध्ये बँकेला ४१ कोटी रुपये देऊ केले होते. पण, बँकेने ७६ कोटीचे कर्ज अवघ्या २५ कोटीत सेटलमेंट केले. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मद्यार्क निर्मिती कारखान्यासाठी महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेकडून कर्ज घेतले होते. या बँकेने संभाजी निलंगेकर यांना कर्जाचे व्याज आणि मुद्दलातले ५१ कोटी ४० लाख रुपये माफ केले आहेत.

सीबीआयने संभाजी निलंगेकर आणि कंपनीची चौकशी करुन ३ हजार २७ पानाचे आरोपपत्र लातूर न्यायालयात दाखल केले. यावर अद्यापही सुनावणी झाली नसून सुद्धा महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक उदार होऊन मुद्दल कमी करुन आणि व्याजात माफी देऊन सेटलमेंट केली.

संभाजी निलंगेकर यांच्याकडून महाराष्ट्र बँकेला २० कोटी ९ हजार रुपये येणे आहे. त्यावर २१ कोटी ७५ हजार रुपये व्याज येणे बाकी आहे. म्हणजे संभाजी निलंगेकर यांच्याकडून एकूण ३९ कोटी ८६ लाख रुपये येणे बाकी आहे. तर महाराष्ट्र बँकेने व्याज माफ केले असून मुद्दलसाठी ८ कोटीची सूट दिली आहे. संभाजी निलंगेकर यांना १२ कोटी ७५ लाखाची परत फेड करायची आहे.

युनियन बँकेने ३० जुलै २०११मध्ये एनपीए झाले. युनियन बँकेने मुद्दल २० कोटी ५१ लाख आहे. त्यावर १६ कोटी ४० लाख रुपये व्याज आहे. आतापर्यंत ३७ कोटी ४ लाख रुपये वसूली झाली आहे. या बँकेनेसुद्धा सगळे व्याज माफ केले असून मुद्दात ८ कोटीची सूट दिली. त्यामुळे ३७ कोटी ४ लाखापैकी १२ कोटी ७५ लाख एवढी रक्कम भरायची आहे.

संभाजी निलंगेकर यांना दोन्ही बँकेकडून ७६ कोटी ९० लाख एवढे देणे होते. त्यापैकी २५ कोटी ५० लाख रुपयांना ही दोन्ही खाती सेटल झाली. यामुळे या दोन्ही बँकांना एकूण ५१ कोटी ४० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

Aprna

अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडेंकडून खास शुभेच्छा; परळीत 45 फुटांची प्रतिकृती

News Desk

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी !

News Desk
Uncategorized

अण्णा हजारे यांच्या मागण्यांवर पीएमओकडून सकारात्मक विचार

swarit

नवी दिल्ली जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. अण्णाच्या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत आहे. जर आज अण्णा यांना केंद्र सरकारकडून सकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास उपोषण मागे घेणार आहेत. अशी माहिती मिळाली आहे. अण्णा हजारे यांचा प्रकृती खालावत चालली आहे.

Related posts

राहुल गांधीमुळे माझा मुलगा पायलट झाला

News Desk

रोहित पवारांनी औरंगाबाद घटनेतील मजूरांना वाहिली श्रद्धांजली

News Desk

यंदाच्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात टक्क्यांनी वाढेल, अहवाल संसदेत सादर

News Desk