HW News Marathi
महाराष्ट्र

जम्मू-काश्मीरमधील ‘त्या’ तीन माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करा, शरद पवारांची मागणी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर येथील माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, फारुक अब्दुल्ला आणि महेबूबा मुफ्ती या तिघांनाही अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमधील दोन्ही नेत्यांची सुटका करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी दोघांनी जॉईंट स्टेटमेंट जारी केले आहे.

शरद पवारांनी त्यांचे जॉईंन स्टेटमेंट त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट केले आहे. यात पवार म्हणाले की, “विविधतेते एकता असलेला भारत देश असून देशाची राज्यघटना यावरच उभारली आहे. समता, बंधुता आणि अंखडता ही आपल्या संविधानाची मुल्ये आहेत. प्रत्येक नागरिकाला घटनेने स्वतंत्र आणि मुक्तपणे जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे, मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानबद्ध केलेल्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची सुटका करावी, अशी मागणी या जाँईंट स्टेटद्वारे केली आहे.”

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून आता जवळपास सात महिने उलटून गेले आहेत तरी देखिल काश्मीरच्या या बड्या नेत्यांना अजूनही स्थानबद्ध ठेवल आहे. जम्मू आणि काश्मीरचे दोन माजी मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी पवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही ! मनसेने शिवसेनेला डिवचले

News Desk

सभा गाजवणाऱ्या गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली, सर्वांनाच केलं मंत्रमुग्ध

News Desk

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk