HW News Marathi
महाराष्ट्र

तिसऱ्या लाटेसाठी राज्याची पूर्ण तयारी! तर ‘ते’ पत्र कधीचं, राजेश टोपेंकडून खुलासा!

जालना। महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. नीती आयोगाने कोरोनाची जी तिसरी लाट येणार असल्याचे म्हटले होते. नीती आयोगाच्या पत्राची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नीती आयोगाचे जून महिन्यातील पत्र असून त्यावरुन सध्या चर्चा सुरु असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने….

राज्यातील मंदिरे आणि शाळा कॉलेज सध्या तरी उघडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊनच मंदिर आणि शाळा कॉलेज उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.भाजपच्या जनआशीर्वाद यात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुठल्याही बाबतीत गर्दी टाळली पाहिजे, असे आवाहन केले आहे.

लस नाकातून घ्यायची की दंडातून घ्यायची

लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही, असं समजू नये. संसर्ग होऊ शकतो. संसर्गाची परिणामकारकता लसीमुळं कमी होऊ शकते. लसीमुळे त्या व्यक्तींना आयसीयूची गरज लागणार नाही. ऑक्सिजनची गरज लागणार नाही. अमेरिका आणि इतर देशांमध्ये लसीकरण झालंय त्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असला तरी मृत्यूदर कमी झालेला दिसतो. त्यामुळं नागरिकांनी कोरोना लस घेतली असली तरी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. लस नाकातून घ्यायची की दंडातून घ्यायची यासंदर्भात आयसीएमआर आम्हाला मार्गदर्शन करत असते, ते सांगतील तसा लसीकरणाचा कार्यक्रम आम्ही राबवू, असं राजेश टोपे म्हणाले.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खंडणी प्रकरणी सचिन वाझेला दिलासा नाहीच, १३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

News Desk

“…आणि भाई जगताप पोलिसांवर भडकले”, म्हणाले…

News Desk

औरंगाबादेतील सिल्लोड जळीतकांडामधील पीडित महिलेचा मृत्यू

swarit