HW News Marathi
महाराष्ट्र

आर्थिक संकट लक्षात घेता, येत्या काळात वैयक्तिक जीवनात काटकसरीने काम करा !

मुंबई | कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन केला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटनंतर भविष्यात आर्थिक संकट येणार आहे. व्यवसाय, रोजगार, शेती, व्यापार बंदचा परिणाम होणार आहे. स्वतः ला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे येत्या काळात वैयक्तिक जीवनात आपल्याला काटकसरीने काम करायचे आहे, असा सल्ला राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन आज (३० मार्च) दुसऱ्यांदा जनतेचे मनोधैर्य वाढवण्यासाठी संवाद साधला. शरद पवार पुढे म्हणाले की, वायफळ खर्च टाळावा. त्याची काळजी आतापासूनच घ्यायला हवी. ही घेतली नाही तर याचे दुष्परिणाम आर्थिक संकटातून येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

लॉकडाऊूनच्या घोषणेनंतर राज्यातील उसतोड मजुरांची स्थिती बिकट झाली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार सांगितले की, आपण साखर कारखानदारांना याबाबत सूचना दिली असल्याचे सांगितले आहे. ‘तुमच्या कारखान्याची तोड पूर्ण झाली असो वा नसो, तुमच्याकडील ऊसतोड मजुरांची सोय तुम्ही करावी, अशा सूचना मी साखर कारखानदारांना दिल्या आहेत,’ असे ते म्हणाले.

आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन आपण करत नाहीय. काही लोक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करावी लागत आहे. ही वेळ आणुया नको बाहेर पडूया नको, असे सांगतानाच मी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत आहे. योग्य सल्ले देत आहे. मात्र मी कुणालाही भेटत नाही. योग्य ती खबरदारी घेत आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

काही दवाखाने, हॉस्पिटल बंद करू नका

काही दवाखाने, हॉस्पिटल बंद केली आहेत. तर काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली आहे ही गंभीर गोष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे माझे सहकारी दिवसरात्र सेवा देत आहेत. अन्य डॉक्टरही काम करत आहेत परंतु काही डॉक्टरांनी ओपीडी बंद केली हे योग्य नाही. हा एकप्रकारचा धक्का आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सेवा देण्याचे काम थांबवू नका, दवाखान्यांचे दरवाजे बंद करु नका असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा! – मुख्यमंत्री

Aprna

काँग्रेस पक्षाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नाही, नितेश राणेंचा आरोप

News Desk

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानिया यांनी केली कोर्टात मागणी

News Desk