HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्यांची पवारांची माहिती

मुंबई | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चिन्हे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (२० नोव्हेंबर) संसद भवनात भेट झाली. या दोघांमध्ये पाऊण तास संसदेच्या कार्यलयात पवार आणि मोदी यांच्यात बैठक झाली. मोदी आणि पवार यांच्या राज्यातील परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली असून केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी त्यांनी त्यांच्या बैठकीत केल्याचे त्यांनी सांगितले.

शदर पवार आणि मोदी यांच्यात भेटीदरम्यान, “राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा, राजाकीय मुद्द्यावर चर्चा झाली नाही,” अशी माहिती पवारांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितले. या दोघांच्या भेटीदरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून किती प्रमाणत मदत केली जाऊ शकते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना चर्चेत सहभागी करून घेतले आहे.

शरद पवारांना शेतीबाबत अधिक माहिती आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे जर एखादी समस्या असेल तर कोणीही त्यांची भेट घेऊ शकते, असेही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. राऊत पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. राज्यात सध्या ओला दुष्काळ आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात फक्त दोनच नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली होती. एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे शेतीकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले त्यांची त्यांनी पाहणी केली आहे. पंतप्रधान मोदी आज शरद पवारांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल सांगून त्यावर चर्चा करणार आहेत, असे राऊत म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कुमार मंगलम बिर्ला, सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण तर ४ मान्यवर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Aprna

पर्यटनवाढीसाठी आराखडा तयार करुन प्रभावी अंमलबजावणी करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंनी अखेर दिलं स्पष्टीकरण!

News Desk