HW News Marathi
महाराष्ट्र

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी योग्यच- शरद पवार

पुणे | उत्तर प्रदेशमधील १९ वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कार झाला. ही घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. याआधी निर्भया प्रकरण झाले होते आणि आता हे प्रकरण. उत्तर प्रदेश पोलिस आणि योगी सरकारवर संपूर्ण देशभरातून टीका केली जात आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले मत मांडत या कृत्याचा निषेध केला आहे. आज (२ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकारांशी ते संवाद साधत होते. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी भाष्य करत आपले मत मांडले.

हाथरसमध्ये त्या युवती बरोबर बलात्कार झाला नाही, असे पोलीस आयुक्तांचे म्हणणे ऐकले. पण तिची हत्या तर झाली आहे. मग तिचा मृतदेह पालकांच्या ताब्यात का दिला नाही? उत्तर प्रदेश पोलीस कायदा हातात घेऊन कसे वागतात? कायद्याचं राज्य, मूलभूत अधिकार यावर तुमचा कवडीचा विश्वास नाही, असं दिसतं, असे पवारांनी नमूद केले आहे. दुर्दैवाने महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. हे घडत असताना राज्य सरकाराची भूमिका ही फक्त बघ्याची आहे, असे पवार म्हणाले. तसेच, उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली जात आहे त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले ही ही मागणी योग्यच आहे. असे कृत्य कोणत्याही राज्यात होता कामा नये असेही त्यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पडळकरांनी गांजा घेऊन बिरोबाची खोटी शपथ घेतली होती का?”, शेळकेंचा पलटवार

News Desk

प्राचार्य चव्हाणांच्या निलंबनासाठी विद्यार्थ्यांचं उपोषण

News Desk

खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली-अजित पवार

News Desk