HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं ! | किरीट सोमय्या

ठाणे | राज्यातील मुख्य विरोधीपक्ष असलेल्या भाजपने गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडणाऱ्या धक्कादायक घटनांवरून महाविकासआघाडी सरकारची पूर्ती कोंडी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे एक मागणी केली आहे. “मनसुख हिरेन प्रकरण हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख अपयशी ठरले आहेत. त्यामुळे, अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

“सर्व पुरावे असतानाही अनिल देशमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेशरद पवार यांनी देशमुख यांना ताबडतोब घरी पाठवावे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, सोमय्या यांनी मनसुख हिरेन यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्यानंतर मीडियाशी बोलताना अनिल देशमुख यांची शरद पवारांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवनीत राणांच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांचे ट्वीट करत दिले उत्तर

Aprna

‘अमित ठाकरेंकडे ‘मनविसे’चं अध्यक्षपद द्यावं’, अमेय खोपकर!

News Desk

शेतकऱ्यांचा ‘भारत बंद’ हे जनतेचे आंदोलन; काँग्रेस शेतकऱ्यांसोबत!- बाळासाहेब थोरात

News Desk