HW News Marathi
महाराष्ट्र

“माझ्याकडे १० वर्ष कृषी खातं होतं, पण शेतकऱ्यांवर….”, शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला हल्ला!

मुंबई। देशात कृषी कायद्यावरून बरंच राजकारणं सुरु आहे. अजूनही शेतकरी आंदोलन करत आहेत. यावरून राजकीय वातावरणात देखील अनेक खळबळ माजली आहे. त्यातच आता पिकाला योग्य भाव मिळत नसल्याची गोष्ट समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता त्यांचं मत सांगत मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होत असून यानिमित्ताने माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. माझ्याकडे कृषी खातं असताना शेतकऱ्यांच्या पीकाला योग्य भाव देत होतो असं शरद पवारांनी सांगितलं आहे. मात्र सध्या लक्ष दिलं जात नसल्याचं सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं मी पाळलं

शरद पवार यांनी थेट मोदी सर्कावर हल्ला चढवत त्यांच्यावर टीका केली आहे. “तोडणीचा खर्चही निघत नसून शेतकरी पीक फेकून देत आहेत. कांद्याचा खर्चही निघत नसून अन्य गोष्टींनाही किंमत मिळत नाहीये. माझ्याकडे १० वर्षीय केंद्रीय कृषी खातं होतं. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणं यावेळी मी कटाक्षाने पाळलं. यामुळे शेतकरी या देशाची भूक भागवतोच, मात्र संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवण्याची कामगिरी करु शकतो. शेतकऱ्यांनी हे करुन दाखवलं आहे,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं. “पण दुर्दैवाने केंद्र सरकारमध्ये यासंदर्भात गरज आहे तितकं लक्ष दिलं जात नाही आहे. त्यामुळे शेतमालाच्या किंमती घसरताना दिसत आहे,” असा आरोपही यावेळी शरद पवारांनी केला आहे.

शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही

पवार म्हणाले की ‘राष्ट्रवादी’कडून जी यादी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यपालांना दिली. त्यात त्यांचे नाव आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. त्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतो आहोत. शेट्टी नाराज आहेत का, हे मला माहिती नाही. त्यांनी कोणती भूमिका घेतली असेल, तर त्याबद्दल मला कल्पना नाही, असेही पवार म्हणाले आहेत.

ईडीचा गैरवापर

महाराष्ट्रातच नव्हे, तर पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतही ईडीचा गैरवापर सुरू आहे. या माध्यमातून विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केंद्राकडून सुरू आहे. ईडीचा असा गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सगळा सत्यानाश चालू आहे; नवीन निर्बंधांनंतर चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

News Desk

राणा म्हणतात, ‘मला कुठलीही नोटीस नाही’!

News Desk

” विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना मदत करा”, दरेकरांची मागणी

News Desk