HW News Marathi
महाराष्ट्र

“विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच”;थोरातांना पवार म्हणतात,”निवडणुकीबाबत तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा”!

मुंबई। ५ आणि ६ जुलैला यंदाचं राज्याचं पावसाळी अधिवेशन होणार असून, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार आहे. हे पद रिक्त असल्याने भाजपने थेट राज्यपालांकडे धाव घेऊन, तातडीने अध्यक्षांची निवड कऱण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता काँग्रेसकडून ही निवड याच अधिवेशनात होणार असल्याची माहिती दिली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केलं आहे कि या अधिवेशनात काँग्रेसचाच अध्यक्ष होईल. यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

महाविकास आघाडीमध्ये विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. निवडणूक घेण्यास तिन्ही पक्षांनी एकत्र निर्णय घ्यावा. काँग्रेसने त्यांचा उमेदवार ठरवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ. ज्यावेळी आम्ही सरकार बनवलं, त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचं ठरलं होतं. ती काँग्रेसची जागा आहे. त्याची निवडणूक घ्यायची असेल तर तिन्ही पक्षांनी निर्णय घ्यावा.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?

बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य केलं होतं कि, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत. नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परदेशवारी न करताही कोरोना पॉझिटिव्ह ?

swarit

वर्धा येथील लष्करी तळावर भीषण स्फोट, ६ जणांचा मृत्यू

News Desk

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर

Aprna