HW News Marathi
महाराष्ट्र

सगळ्यांनी फिल्डवर जायची गरज नसते, शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

तुळजापूर | गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरीच आहेत बाहेर येत नाहीत अशी टीका केली जात आहे. त्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर न पडण्यावर भाष्य केले आहे. ज्यावेळी अशा प्रकारचं मोठं संकट येतं तेव्हा महत्त्वाच्या व्यक्तिंनी मुंबईत एका ठिकाणी बसून नियोजन करणं आवश्यक असतं. प्रत्येक जिल्ह्याशी संपर्क साधून काय उपाय योजना करावी लागेल याचा आढावा घ्यायला लागतो. आम्हीच मुख्यमंत्री ठाकरे यांना विनंती केली की आम्ही फिल्डवर आहोत तुम्ही मुंबईत एका ठिकाणी बसा आणि निर्णय घ्या. सगळ्यांनीची फिल्डवर जायची आवश्यकता नसते तर काही जणांनी मुंबईत एका जागी बसून निर्णय घेण्याची गरज असते, असं सांगत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत या विरोधकांच्या टिकेचा समाचार शरद पवारांनी घेतला व मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

राज्यात भूकंप, अतिवृष्टी किंवा अन्य कुठलंही संकट असो… अशा संकटात शरद पवारच घटनास्थळावर सर्वात आधी कसे पोहोचतात?, असा प्रश्न विचारताच शरद पवार यांनी मला गप्प बसवत नाही म्हणून मी येतो, असं मिश्किल उत्तर दिलं आणि पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला… राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहीणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. राज्यातील जनता स्थानिक पातळी, विधानसभा, लोकसभा अशा सगळ्या ठिकाणी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. आता संकटकाळी मी शांत कसा बसू? लोकांचा विश्वास माझ्यावर असल्यामुळेच मला स्वस्थ बसवत नसल्याचंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यामुळं उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार कालपासून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना पवार यांनी ‘ज्यांच्या हातात प्रशासनाची जबाबदारी असते त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेण्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं’, असं उत्तर देत वेळ मारुन नेली. कोरोना संकटाच्या काळात आम्हीच मुख्यमंत्र्यांना तुम्ही एका ठिकाणी बसा, आम्ही सर्वजण फिरु, अशी विनंती केल्याचंही पवारांनी सांगितलं. आम्हा सर्वांच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका स्वीकारल्याचं पवारांनी यावेळी आवर्जुन सांगितले. मात्र, अतिवृष्टीमुळं आलेलं संकट मोठं असल्यानं मुख्यमंत्रीही आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचंही पवार सांगायला विसरले नाहीत.

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शरद पवार कालपासून उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर, काक्रंबा, लोहारा, सास्तूर अशा अनेक भागांची पाहणी केली. तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवादही साधला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शरद पवार यांच्यासमोर मांडल्या आणि सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी केली. त्यावर राज्य सरकारशी चर्चा करुन तातडीनं काही उपयायोजना करता येते का ते पाहू. तसंच मदतीसंदर्भात केंद्र सरकारशीही चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील नुकसानाची त्यांना माहिती देणार असल्याचंही पवार म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्ही हवी ती मदत मागा मी दिल्लीतून आणतो”, श्रीनिवास पाटलांचं आश्वासन..!

News Desk

राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला मुख्यमंत्री गेले राजभवनावर!

News Desk

बालभारतीच्या ८ वीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याऐवजी कुरबान हुसेन यांच्या नावाचा उल्लेख 

News Desk