HW News Marathi
महाराष्ट्र

गीता वाटण्याऐवजी निकाल वेळेवर लावा | उद्धव ठाकरे

पुणे | मुंबईतील महाविद्यालयात गीता वाटण्याऐवजी विद्यापीठाचे निकाल वेळेवर लावावे, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेऊन ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी तावडेंसह भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर नाशाणा साधला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे निकालचा गोंधळ टाळण्यासाठी गीता वाटपाचा कार्यक्रम भाजपने सुरू केला असल्याचे यावेळी ठाकरे म्हटले आहे.

मोदी सरकारने ज्याप्रमाणे एक क्षणात नोटाबंदी केली. त्याचप्रमाणे ‘राम मंदिर’ का नाही होऊ शकत ? आणि राम मंदिर समान नागरी कायदा, ३७० कलम रद्द करणे या सगळ्या गोष्टी आतापर्यंत का नाही झाल्या ? असे सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांची जबाबदारी सगळ्यांची असल्याचे सांगून उद्धव ठाकरेंनी मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्नाला बगल दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरेंनी यावेळी मांडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याचे अर्थसंकलपीय अधिवेशन १ मार्चपासून सुरू होणार

News Desk

३-४ महिने भूमिगत होतात, आणि एखादे व्याख्यान देऊन पुन्हा गायब; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

Aprna

मुंबई पोलिसांचा संडे स्ट्रीट उपक्रम कौतुकास्पद! – दिलीप वळसे-पाटील

Aprna
देश / विदेश

‘राम मंदिर’ लोकसभा निवडणुकीपूर्वीच उभारू | अमित शहा

News Desk

हैदराबाद | भाजपनं २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देण्याचं ठरवलं आहे. कारण आयोध्येत राम मंदिर बांधकामाला निवडणुकीपूर्वी सुरुवात केली जाईल असं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं. काल हैदराबादमध्ये आमित शहा यांनी भाजप नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत ठरविले आहे.

भाजप नेते पी. शेखर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तेलंगणा राज्याच्या भाजप कार्यलयात ही बैठक पार पडली. आतापर्यंत राम मंदिर वादविवादाच्या गोष्टीचा क्रम पाहिला. तर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी बांधकामास सुरुवात होऊ शकते असे शहा यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. थोडे दिवस धीर धरा, अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, असं विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या आठवड्यात केलं होतं. आता अमित शाहांनीही हा नारा दिला आहे. सध्या राम मंदिराचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आहे. तर अमित शहांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राम मंदिर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

राम मंदिराचा मुद्दा नेहमीच राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. शिवसेनेनेही भाजपला सातत्याने याच मुद्द्यावरुन टोमणे लगावले आहेत. शिवाय भाजपचे अनेक नेतेही वेळो-वेळी राम मंदिराबाबत वक्तव्य करत असतात. नुकतंच भाजपचे माजी खासदार आणि राम जन्मभूमी न्यायसचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास दास वेदांती यांनी म्हटलं होतं. की, भाजपने जर राम मंदिर उभारलं नाही, तर ते रसातळाला जातील. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनीही राम मंदिराबाबत वेळोवेळी वक्तव्यं केली आहेत. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय दुसरी कोणतीच वास्तू उभी राहणार नाही, तिथे फक्त राम मंदिरच उभं राहणार, असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. कर्नाटकातल्या धर्मसंसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Related posts

ओबामा, बिल गेट्स यांच्यासह दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक 

News Desk

‘या’ कारणामुळे बॅंका ५ दिवस बंद राहणार

News Desk

मनी लाँड्रिंग ॲक्टच्या घटनात्मक वैधते विरोधात रॉबर्ट वाड्राची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

swarit