HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयाचे वेळापत्रक बदलले, २ शिफ्ट ऐवजी एक दिवसाआड होणार काम!

मुंबई | मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी निर्बंध घातले आहेत. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आता मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना दिवसाआड कामावर बोलवण्यात येणार असून तसा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. लोकलमधील गर्दीमुळे ही संख्या अधिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे मंत्रालयात शिफ्टची वेळ बदलण्यात आली होती. मंत्रालयात एका शिफ्ट ऐवजी दोन शिफ्ट सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही मंत्रालयातील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने अखेर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड कामावर बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव यांनी सर्व सचिवांना सूचना केल्या होत्या. यात आठवडा, प्रत्येकी १ दिवसआड अथवा ३ दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली होती.

मंत्रालयातील प्रत्येक विभागात सामाजिक सुरक्षा अंतर, कर्मचारी गर्दी होणार नाही, सॅनिटाझयर वापर याकडे लक्ष सचिवांनी द्यावे, असे आदेश मुख्य सचिव यांनी दिले होते. त्यानुसार, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण, अखेरीस एकदिवस आड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटीचे कार्पेट; राऊतांचा मुनगंटीवारवर आरोप

Aprna

पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा समाजाचे आरक्षण रद्द झालेे , सदाभाऊ खोतांची जहरी टीका

News Desk

महाराष्ट्रात नको दिल्लीत जागरण करा! छगन भुजबळांचा विरोधकांवर निशाणा

News Desk