HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येत्या जूनपर्यंत केवळ ५ रुपयांत शिवभोजन

मुंबई | ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर व विद्यार्थ्यांचा विचार करून ठाकरे सरकारकडून आता शिवभोजन थाळीची येत्या जूनपर्यंत केवळ किंमत ५ रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्यातील कोणताही वर्ग उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे. राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाने घेतल्याची माहिती कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे.

शिवभोजनच्या वेळेतही वाढ

नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा सवलतीचा ५ रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिवभोजनालय सुरू करावीत असे आदेशही राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणे तसेच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणे, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी वीस सेकंद साबणाने स्वच्छ करणे, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणे, भोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे झालेले नुकसान पंतप्रधान पीक विम्याच्या नियमात बसविण्यास शासन प्रयत्नशील! – अब्दुल सत्तार

Aprna

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का? भाजपचा सवाल

News Desk

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ!

News Desk