HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणे यांना शिवसेना का घाबरते?

पी. रामदास

मुंबईः नारायण राणे यांना दोन निवडणुकांत पराभव करून शिवसेनेने आपले कोकणात वर्चस्व निर्माण केले आहे. आता राणेंनी कॉँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करून वेगळी चुल मांडली आहे. त्यांना मंत्रिमंडळात समावेश होण्याचीही शक्यता आहे. असे असताना राणे एनडीएमध्ये दाखल झाल्यास आम्ही त्यातून बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेने सामनामधून दिलेला आहे. राणे यांनी स्वतंत्र पक्ष स्थापला आहे, त्यांची कोकणातील ताकद आता केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती सीमित राहिलेली असताना शिवसेना त्यांना का घाबरते, असा कळीचा प्रश्न या सर्व घडामोडीच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

राणेंना घाबरण्याची खरी कारणे इतिहासात दडलेली आहे. राणे यांनी वेळोवेळी त्याची उजळणी केलेली आहे. उद्धव यांचा कारभार, भष्ट्चार आदी प्रकरणी चव्हाट्यावर येण्याची भीती शिवसेनेला सतावत आहे. राणे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिवसेनेची उठसूठ सत्ता सोडण्याची भाषा सौम्य होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना राणेंकडून जशाचतसे उत्तर देऊन गार केले जावू शकते. भाजपकडून राणेंचा वापर शुत्रुचा शत्रु आपला मित्र अशासाठी केला जाऊ शकतो. या सर्व बाबी शिवसेनला खटकत आहेत. राजकारणात ज्याला कायम शत्रु माने, त्याच्या मांडीला मांडी लावून बसण्याची हिंमत शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये उरलेली नाही.

जर राणे यांना शिवसेना घाबरत असेल तर त्याचे मुख्य कारण काय असावे, असाही या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला जावू शकतो. त्याचे उत्तर इतिहासात दडलेले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून राणे यांची ओळख होती. स्थानिक पातळीवर शिवसेना वाढवणे, आंदोलन, मारझोड करून दहशत निर्माण करण्याचे काम त्यावेळी राणे यांनी इमाने-इतबारे निभावले होते. त्याचे फळ त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या रुपात मिळाले. परंतु बाळासाहेबांनी उद्धव यांच्याकडे पक्षाची धुरा सोपावल्यापासून राणे आणि शिवसेनेत उभी दरी निर्माण झाली. त्यात आर्थिक हितसंबंध आले. तिकीटासाठी पैसे घेतले जात असल्याचे आरोपदेखील झाले. असे असताना शिवसेना डळमळीत झालेली नाही. परंतु आता राणे पुन्हा सक्रिय झाले आहेत. आगामी निवडणुकीता शिवसेना-भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा प्रभाव कमी करण्यासाठी राणे यांचा प्रभावी वापर होऊ शकतो. असे झाल्यास शिवसेनेला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या जागा यावेळी कमी होण्याची भीती त्यांच्या नेतृत्वाला सतावत आहे. इतके वर्ष संघर्ष करून सत्ता मिळाली आहे, ती इतक्या सहजासहजी सोडून देण्याची किमान नेत्यांची तरी मानसिकता दिसत नाही. अशा वेळी शिवसेनेला निमुटपणे होणारा अन्याय सहन करत सत्तेत राहावे लागणार आहे, किंवा राणे यांच्याशी न बोलता तडजोड करावी लागाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीत राहणाऱ्या दहशतवाद्याची माहिती नव्हती हे ATS चं अपयश!

News Desk

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

News Desk

महाविकास आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य; राजू शेट्टी बाहेर पडण्याचं कारण नव्हते! – जयंत पाटील

Aprna