HW News Marathi
महाराष्ट्र

स्वच्छ स्थानकासह प्रवाशांना पुष्पगुच्छ देत भोकर आगाराचा वर्धापन दिन उत्साहात

उत्तम बाबळे

नांदेड – “प्रवाशांच्या सेवेसाठी ” हे ब्रीदवाक्य घेऊन अविरत सेवा करत असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.) बस सेवेच्या स्थापनेला १ जून रोजी ६९ वर्ष पुर्ण होत असल्यामुळे भोकर बस आगाराच्या वतीने बसद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांना पुष्प देऊन यथोचित सत्काराने व स्थानक आणि बसेसच्या स्वच्छता करुन ६९ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला.

राज्यातील जवळपास १९० बस आगार तोट्यात असल्याने आधुनिक बसेसची वाढ करण्यात यावी व अवैद्य प्रवासी वाहतुकीवर संबंधीत विभागाने आळा घालावा असे मनोगत याप्रसंगी आगार व्यवस्थापक आर.वाय.मुपडे यांनी व्यक्त केले. राज्यात वाहनाद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतूकीची सुरुवात खासगी व्यावसायिकांद्वारे १९३२ च्या सुमारा झाली. पुढे आठ दहा वर्षांनी या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली.१९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेचे क्षेत्र आज महाराष्ट्र ,कर्नाटक,आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि तेलंगणा राज्यात व्याप्त आहे.

१ जून २०१७ रोजी हे महामंडळ स्थापनेला ६९ वर्ष पुर्ण होत आहेत.याच अनुशंगाने भोकर आगाराच्या वतीने विविध उपक्रमांनी वर्धापण दिन साजरा करण्यात आला.१ जून रोजी सकाळी बस स्थानक,आगार व संपुर्ण बसेसची स्वच्छता करण्यात आली.यानंतर आगार व्यवस्थापक आर.वाय.मुपडे,प्रमुख पाहुणे विभागीय कार्यशाळा सहयंत्र अभियंता एस.बी.नाईक,विभागीय अभियंता अनिल कुमार माने,वाहक,चालक,यांत्रीक व सर्व कर्मचा-यांनी बसने प्रवास करण्यासाठी स्थानकात आलेल्या आणि बस मध्ये बसलेल्या प्रवाशांना पुष्प देऊन यथोचित सत्कार केरुन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.हा उपक्रम दिवसभर राबविण्यात आला.

यावेळी महामंडळ तोट्यात असल्याचे चर्चील्या जात असल्याने उत्पन्न वाढविण्यासाठी काय उपाय योजना अपेक्षीत आहेत ? असे विचारले असता महाबातमीशी आगार प्रमुख मुपडे म्हणाले की,राज्यातील २५० बस आगारापैकी केवळ ५० ते ६० आगारच नफ्यात असून जवळपास १९० आगार तोट्यात असल्यामुळे प्रवाशांना आकर्षीत करण्यासाठी आमची ” लाल बस ” ही कात टाकत असून महामंडळाने आधुनिक बसेस खरेदी करणे सुरु केले आहे.ग्रामीण भागा पर्यंत त्या बसेस सद्या येणे शक्य नसल्यामुळे आहे त्यात प्रवासी वाढ करण्यासाठी अवैद्य वाहतूकीवर राज्य परिवहन विभाग (आर.टी.ओ.) व पोलीस प्रशासनाने आळा घालावा.असे झाल्यास उत्पन्न वाढेल व त्यासाठी आम्ही सर्वजन अविरत प्रवासी सेवेसाठी प्रयत्न करु, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…निरा डाव्या कालव्याचा संघर्ष

News Desk

उद्धव ठाकरेंविरोधात उत्तरप्रदेशमध्ये ऑनलाईन तक्रार दाखल!

News Desk

नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Chetan Kirdat