HW News Marathi
महाराष्ट्र

“राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलाय”, व्हिडिओद्वारे रवी राणांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई। राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलेलाआहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. राज्यात सुख आणि शांततेसाठी आम्ही मातोश्री येथे जावून हनुमान चालिसा पठाण करण्यासाठी आम्ही जाणार आहोत, असा पुनरुच्चार राणांनी फेसबुक लाईव्ह करते केला आहे. राणा दाम्पत्य आज २३ एप्रिल) मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करणार आहेत, हा त्यांचा निर्धार आहे खरा, परंतु, राणा दाम्पत्यांच्या निवासस्थान बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती असून बजरंग बली की जय अशा घोषणा देत आहेत. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना त्यांच्या घराबाहेर पडू देत नाहीत.

रवी राणा म्हणाले, “शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालले पाहिजे. आता शिवसेनेत बाळासाहेब ठाकरेंचे विचार राहिले नाहीत. बाळासाहेबांचे शिवसैनिक असते तर आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिले असते. पोलीस आम्हाला घरा बाहेर पडून देत नाहीत. आमच्या घराबाहेर उभे असून ते आमच्यावर दादागिरी करत आहेत, असा आरोप त्यांनी फेसबुक लाईव्ह करताना केला आहे.

राणा दाम्पत्यांनी त्यांच्या खार येथील निवासस्थानी देवघरात पुजा केल्याच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ त्यांनी गणपती बाप्पा, हनुमान आणि श्री रामचंद्रचा आशिर्वाद घेताना दिसत आहे. यानंतर राणा म्हणाले, “राज्याच्या उन्नती आणि शांततेसाठी प्रार्थना केली आहे. राज्यात शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारी आपण पाहत आहोत. राज्याला मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शनी लागलेला आहे, असे ते म्हटले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk

याकुब मेननच्या घरात बीएमसी घुसली नाही मात्र कंगनाच्या ऑफिसवर कारवाई केली – आशिष शेलार

News Desk

नया है वह! अब्दुल सत्तार यांच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा टोला

Aprna