HW News Marathi
महाराष्ट्र

दिव्यांगांकडून नाकर्त्या शिवसेना-भाजप सरकारला बांगड्यांचा आहेर – दिव्यांग सेना

मुंबई | दिव्यांग सेनेकडून भांडुपमधील शिवाजी तलाव येथे दिव्यांगांच्या न्यायासाठी ‘भिख मांगो’ उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारवर दिव्यांगांवरील डावलण्याच्या कृतीवर हल्लाबोल करण्यात आला. ‘भिख मांगो’ उपोषण दिव्यांग सेना मुंबई उपाध्यक्ष रश्मी कदम यांचा पुढाकाराने घेण्यात आला होता. पत्रकारांशी बोलतांना रश्मी कदम म्हणाल्या शिवसेना-भाजप दिव्यांगांसाठी केले काय असे प्रश्न केले. या शिवसेना-भाजप सरकार ने महाराष्ट्र मध्ये दिव्यांगांना रोजगार किती दिला ?

१ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांनी दिव्यांग पेंशन मध्ये दिव्यांगांना भिख टाकण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा दिव्यांग या भाजप-शिवसेना सरकारवर खूप नाराज आहेत. आज दिव्यांगांना भिख मागण्याची वेळ या शिवसेना -भाजपाचा सरकार ने आणले आणि दिव्यांगांच्या मागण्या बृहन्मुंबई महानगरपालिका, इतर महानगरपालिका, नगरपरिषद आणि महाराष्ट्र सरकारने पुर्ण न केल्यास भिख मांगो आंदोलन असेच चालू राहील यांची शिवसेना-भाजप सरकारने नोंद घ्यावी आसे रश्मी कदम यांनी ठणकावून सांगितले. जर २ डिसेंबर २०१८ पर्यंत दिव्यांगांच्या मागण्या पुर्ण करा नाहीतर या भाजप-शिवसेना सरकार ला जागे करण्यासाठी दिव्यांग सेने तर्फे बांगड्यांचा आहेर येत्या ३ डिसेंबर रोजी “जागतिक दिव्यांग दिन” निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना भेट देण्यात येईल.

तसेच महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा आणि गावातून महिला दिव्यांगांनाही मी रश्मी कदम स्वःता दिव्यांग असून सर्वांना आव्हान करते की, आपण ही बांगड्यांचा आहेर या सरकार ला पाठवा. दिव्यांग सेनेचे अध्यक्ष प्रसाद साळवी, सरचिटणीस रोहन सातार्डेकर यांनी ‘भिख मांगो’ उपोषणला हजेरी लावली. मुंबई अध्यक्ष मोहन गुरव, ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज सातोसे, रेहाना कुरेशी ठाणे जिल्हा सरचिटणीस, दिलीप कांबळे, अनिल शिगंणे, वैभव निळेकर, अमित जैस्वाल हे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“मी मास्क घालतच नाही…!” – राज ठाकरे

News Desk

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून सुरुवात

News Desk

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन द्या, ‘सेजस’तर्फे मागणी

News Desk
राजकारण

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

News Desk

मुंबई | विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज (१९ नोव्हेंबर)ला सुरुवात झाली आहे. ओला-उबर चालक आपल्या मागण्यांसाठी विधानभवनावर धडक देणार होते. परंतु ओला-उबर चालक विधानभवनावर पोहचण्याआधीच भारतमाता सिनेमागृहाजवळ पोलिसांनी त्यांना रोखले. चालक त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी करी रोडच्या भारतमाता चौकापासून ते विधानभवनापर्यंत मोर्च्या काढण्यासाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कर्मचारी संघाकडून ओला-उबर चालक मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शनिवारी रात्रीपासून अनेक ओला-उबर चालक संपावर गेले आहे. या चालक प्रतिकिमी प्रतिकिमी भाडे १८ रुपयांवरून २३ रुपये करण्यात यावे, कमीतकमी अंतरांसाठी नीच्चतम भाडे १५० रुपयांवरून १८० रुपये करण्यात यावे अशा मागण्यांसाठी ओला-उबर कर्मचारी संपावर गेले आहेत.

कल्याण,ठाणे,नवी मुंबईतील अनेक चालकही या मोर्च्यात आज सहभागी होण्यासाठी भारतमाता चौकात जमले होते. हजारोंच्या संख्येने ओला चालक मोर्चा काढणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होईल अशी भीती वर्तवण्यात येत होती. त्यामुळे मुंबईत सुरक्षच्या दृष्टीने हा मोर्चा सुरू होण्याआधीच तो पोलिसांनी अडवला आहे.

Related posts

काँग्रेसच्या दोन आमदारांचा भाजपत प्रवेश

swarit

राजस्थानमध्ये जागावाटपावरून गेहलोत-पायलट समोरासमोर

News Desk

आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नागरिक सजग, ३ हजार २११ तक्रारी दाखल

News Desk