HW News Marathi
देश / विदेश

सोनेरी अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस, २४ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार !

मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अयोध्येतील रामजन्मभुमीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे. “अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच,” असा निकाल सर्वोच्च न्यायालायाने दिला आहे. “सोनेरी अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस,” असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाने आज (९ नोव्हेंबर) दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आनंद व्यक्त करताना कोणाच्या ही भावना दुखाणार नाही यांची काळजी घ्या, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले आहे. उद्धव ठाकरे पुढे म्हणले की, “आजच्या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येणे स्वाभाविक आहे.” उद्धव ठाकरे म्हणाले की, “राम मंदिरासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे मोठे योगदान असून येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेणार”, असे उद्धव ठाकरेंनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

 

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आनंद व्यक्त करताना कोणाच्या भावना दुखावू नका,असे आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केले आहे.
  • राममंदिरसाठी अडवाणींचे खूप मोठे योगदान आहे
  • आज बाळासाहेब ठाकरेंची आठवण येणे स्वभाविक आहे
  • न्यायदेवतेला माझा साष्टतांत दंडवत करतोय
  • येत्या २४ तारखेला पुन्हा एकदा अयोध्येत जाणार, येत्या २ ते ३ दिवसात शिवनेरीला जाणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले.
  • येत्या काही दिवसांत लालाकृष्ण आडवाणींना भेटणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले
  • हिंदून बाळासाहेब ठाकरेंची आठवण येत असेल
  • अयोध्या वाद मिटला मला आनंदच आहे
  • गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे
  • सोनेरी अक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘हा’ केवळ अर्थमंत्र्यांचा प्रॉब्लेम आहे, की…’  सुब्रमण्यम यांनी अर्थमंत्र्यांना सुनावलं

News Desk

“कोणता गुन्हा आणि कृत्य केले की फडणवीसांना त्यांचे मन खाते”, संजय राऊतांचा उलट सवाल

Aprna

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद

News Desk