HW News Marathi
देश / विदेश

महाविकासआघाडीतील घडामोडींना वेग ! सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधींमध्ये चर्चा

मुंबई । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे महाविकासआघाडीची मोठी कोंडी झालेली आहे. दरम्यान, राज्यातील या घडामोडींचे पदासाद राजधानी दिल्लीतही उमटताना दिसत आहे. ठाकरे सरकार आणि गृहविभागाच्या झालेल्या मानहानीमुळे दिल्लीतील नेतेही सावध झाले आहेत. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महाविकासघाडीच्या गोटात घडामोडींना मोठा वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (२५ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चेनंतर स्वतः ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. “तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे”, असे ट्विट सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधींशी झालेल्या चर्चेनंतर केले आहे. दरम्यान, या दोन नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र, राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींमुळे दिल्लीपर्यंत अस्वस्थता आहे असे म्हटले जात आहे.

दिल्लीत एकीकडे आज सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधींमध्ये चर्चा झाली आहे. तर दुसरीकडे राज्यात बुधवारी (२४ मार्च) रात्री मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रश्मी शुक्ला, फोन टॅपिंग तसेच पोलीस बदल्यांसंदर्भात केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीशकुमार विश्वासघातकी-राहुल गांधी

News Desk

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला आणि कार सील

swarit

सायंकाळी सातनंतर बंदी असताना ती बस का धावली

News Desk