HW News Marathi
महाराष्ट्र

पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल !

मुंबई | ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा एकसूत्री कार्यक्रम ठरविण्याचे काम सुरु आहे. तीन पक्षांची चर्चा सुरु आहे. राज्याच्या हितासाठी किमान समान कार्यक्रम ठरविण्यासाठी वेळ लागत असल्याचे राऊतांनी आज (१५ नोव्हेंबर) घेतल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

वेगळ्या विचारधारेच्या पक्षांच्या सरकारबदद्ल बोलताना राऊत यांनी वाजपेयी व ‘पुलोद’च्या प्रयोगाचे दाखले दिले. ‘अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुद्धा वेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी देश चालवला होता. इतकेच काय, एकेकाळी शरद पवारांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. अशी सरकारे देशात अनेकदा बनली आहेत. त्यामुळे तशी कुठलीही अडचण होणार नाही,’ असे राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुम्हाला अजून किती बलात्कार आणि विनयभंग पाहिजेत”, फडणवीस अजित पवारांवर भडकले  

News Desk

भंडाऱ्यात झालेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, फडणवीसांची मागणी

News Desk

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

News Desk