HW News Marathi
महाराष्ट्र

“महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष विचलीत करण्याचा भाजपचा प्रयत्न,” राऊतांचा आरोप

मुंबई | देशातील महागाई, बेरोजगारी आणि चीनने केलेली घुसखोरी यावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हनुमान चालिसा आणि बाबरीच्या मुद्यांवर भाजप लक्ष वेधत आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केला आहे. सध्या भाजप देशातील महत्वाच्या प्रश्नांकडे लक्षविचलीत करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा टोला राऊतांनी आज (२ मे) माध्यमांशी बोलताना लगावला.

बाबरी पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, यासंदर्भात राऊतांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “बाबरी पडली तेव्हा शिवसेना कुठे होती, असा कोणी विचारत असेल तर त्यांच्या पक्षातील नेते सुंदरसिंह भंडारींना विचारावे. फडणवीसांनी त्या काळातील सीबीआयचा अहवाल तपासून पाहावा. सीबीआयने तपास आणि केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल त्यांनी एकदा तपासावा. बाबरी पडली तेव्हा शिवसेना कुठे होती असे विचारणारे अज्ञानी असून त्यांना शिवसेना कुठे होती आणि काय करत होती हे त्यांना कळेच, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. 

फडणवीसांनी पुन्हा एकदा रामायण वाचले पाहिजे. त्यांनी रावणाचाही इतिहास वाचालया पाहिजे. रावणाचा अंत हा अहंकाराने झाला. काही लोकांना सत्ता असल्याचा अहंकार असतो तर काही लोकांना सत्ता गेल्यानंतरही अहंकार असतो, राज्यातील विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला आहे, त्याचा अंत करावा नाही तर महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलावे, असे ते म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबासाहेब पुरंदरेंचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात कराण्याची फाईल ५ तास पडून होती? पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Aprna

सगळ्यांचा कोथडा काढून शिवाजी महाराजांनी स्वराज्य टिकवलं आणि महाराष्ट्रातही तसंच होईल – संजय राऊत

News Desk

मुंबई उत्तर भारतीय लोकच चालवतात। संजय निरुपम

News Desk