HW News Marathi
महाराष्ट्र

सगळे एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ !

मुंबई | “राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना एकत्र येऊन राज्याला स्थिर सरकार देऊ,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादींने जे बोले त्यांनी ते करावा, असा आवाहन त्यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी कसोटीचा क्षण असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. यावरून शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राऊतांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत.

“भाजप सत्ता स्थापन करून शकले नाही, म्हणून याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे असून निवेदन दु:खद आणि खेदजनक”, असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. राऊत यांनी आज (११ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत भाजपवर ताशेरे ओढले आहे. दरम्यान राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री पद न देणे हा भाजपचा अहंकार असून भाजपचा अहंकार म्हणजे जनादेशाचा अपमान असल्याचे राऊतांनी यावेळी म्हटले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसेचे मंत्री अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. “भाजप विरोधात बसण्यास तयार आहेत. मात्र, ठरल्याप्रमाणे शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यास तयार नाही, असा आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे. भाजपचे शिवसेनेविरोधात षडयंत्र असल्यामुळे भाजपसोबत राहणार नाही, असे सांगित एनडीएतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत राऊतांनी दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५वी आणि ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली, वर्षा गायकवाडांची घोषणा

News Desk

विकास कामांमध्ये राजकारण नको, अजित पवारांची मेट्रो कारशेडवर प्रतिक्रिया

News Desk

“आपली सर्वोच्च न्यायसंस्था खरंच स्वायत्त आहे काय?” – सामना

News Desk