HW News Marathi
महाराष्ट्र

सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए |

मुंबई | “सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए।,” हिंदीतले प्रसिद्ध कवी दुष्यंत कुमार यांच्या कवितेच्या या ओळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केल्या आहेत. राऊत यांनी त्यांचे मत दुष्यंत कुमार यांच्या कवितेतून व्यक्त केले आहेत.

“महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री फक्त शिवसेनेचाच होणार,” असा दावा संजय राऊत यांनी आज (५ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. अपक्ष आमदारांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. राऊत पुढे म्हणाले की, दिवसेंदिवस शिवसेनेचे संख्याबळात वाढ होत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून ११ दिवस उलट गेले असून राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री आणि सत्तेच्या समान वाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल असा संकेत देखील दिला आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCB च्या समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत नाही, गृहमंत्री वळसे-पाटलांची माहिती!

News Desk

आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा अडचणीत!

News Desk

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात!

News Desk