HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसला दूर ठेवून नवीन आघाडी होणे शक्य नाही! – संजय राऊत

नवी दिल्ली | काँग्रेसला दूर ठेवून नवीन आघाडी होणे शक्य नाही, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधी हे लवकरच मुंबई दैऱ्यावर येणार आहेत, असे ते म्हणाले. राऊतांनी काँग्रेसच्या खासदार राहुल गांधीच्या भेटी घेतली आहे. राऊत आणि गांधी या दोघांमध्ये आज (७ डिसेंबर) भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या. राऊतांनी गांधीसोबत भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधले.

राऊत म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर तुम्हाला सांगेन. राजकीय परिस्थिती-धोरणात्मक, युपीए मजबूत करण्याबात चर्चा आणि महाराष्ट्रातील राजकारणवर देखील राहुल गांधीसोबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. नवीन आघाडी काँग्रेसला दूर ठेवून होणे शक्य नाही. जर कोणी वेगळी आघाडी तयार करणार असेल, तर भाजपविरोधात एकच आघाडी असावी, असे मत राऊतांनी व्यक्त केले. शिवसेना तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला एकत्र आण्यासाठी प्रयत्न करणार का?, या प्रश्नावर राऊत म्हणाले, “या दोन्ही पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवार पुरेसे आहेत. तसेच पवार हे मजबूत नेते आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सबरीमाला मंदिराचे पुजारी म्हणतात, ‘आता या चर्चेला अर्थ नाही’

News Desk

बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्यभरात नाराजी

Aprna

अखेर नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

News Desk