HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणुका घेण्यास परवानगी, संजय राऊतांनी मानले केंद्र सरकारचे आभार

मुंबई | देशात कोरोनाचा वाढता संसर्गमुळे निवडणूका लांबणीवर गेल्या होत्या. यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र, अखेर महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१ मे) परवानगी दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रश्न आता सुटाल आहे. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीला परवानगी दिल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे.

राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, “देशाच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. या मुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चिततेचया वातावरणाचा धुरळा खाली बसेल. महाराष्ट्राची पुण्याई मोठी. महणून महाराष्ट्र दिन हा निर्णय आला.केन्द्र सरकारचे आभार. सत्य मेव जयते!,” असे ते म्हणाले. राऊतांनी दुसरे ट्वीटमध्ये लिहिले, “भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुकीला परवानगी दिली आहे. मी आशा करतो की, जे अनिश्चितताचे वातावरण गेल्या काही दिवसात निर्माणा झाले होते. ते आता संपले. मी केंद्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगाचे आभार मानतो. सत्य मेव जयते!,” असे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उभयतांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचे ४७ रूग्ण , मुंबई आणि उल्हासनरमध्ये महिलेला कोरोनाची लागण !

Arati More

मुंबईसाठी आनंदाची बातमी …..

News Desk

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk