HW News Marathi
महाराष्ट्र

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

मुंबई | राज्या शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून तिढा सुटण्याचे चिन्हे दिसत नाही. शिवसेना सामनाच्या अग्रेलखातून भाजपवर निशाणा साधत आहे. आता ‘तरुण भारत’ने पुन्हा एकदा शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तरुण भारतमध्ये लिहिले की, ” महाराष्ट्राची जनता विक्रमाच्या रूपाने प्रश्न विचारतेय्‌ आणि त्याची उत्तरे देणे सोडून आपले अज्ञान प्रगट करण्याचे काम कुणी करीत असेल तर ते खरेच दुर्दैवी आहे. तरुण भारत माहिती नाही, असे सांगून एकप्रकारे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन करणार्‍या स्वयंघोषित अनुभवी पत्रकाराचे अभिनंदनच करावे लागेल,” अशा शेलक्या शब्दांत ‘तरुण भारत’च्या अग्रलेखात संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

जनादेशाचा सन्मान करणे, ही या दोन्ही पक्षांची कथनी आणि करणी असली पाहिजे. कारण, हा केवळ जनादेशाचा नव्हे तर लोकशाहीचा सुद्धा सन्मान असणार आहे. असे झाले नाही, तर ‘विनाशकाले विपरित बुद्धी’चा दोष माथी मारून घेण्याच्या पलीकडे शिवसेनेकडे काहीही उरणार नाही, अशी टीका केली आहे.

राजकीय पक्षाचा प्रवक्ता म्हणून जर आपल्याला नागपूरचा ९३ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेला ‘तरुण भारत’ माहिती नसेल, तर आपल्याला प्रवक्ता म्हणून नेमणार्‍या नेत्याचा आपण अपमान करतोय्‌ याचे तरी किमान भान त्यांनी ठेवले पाहिजे. प्रत्येक वेळी पक्ष प्रमुखांना अडचणीत आणण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे की काय, अशी शंका अधिक दृढ व्हावी, असेच त्यांचे वागणे दिसते आहे अशी जोरदार टीका शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्यातील नागरिकांना रमजान ईदच्या शुभेच्छा

Aprna

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची बार्टीच्या विद्यार्थ्यांप्रति दिसली उदासीनता! – प्रीतम मुंडे

Aprna

कौशल्य विकास, रोजगारविषयक विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवू! – उपमुख्यमंत्री

Aprna