HW News Marathi
Covid-19

फक्त एक विनंती, ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी !

मुंबई |पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये,” असा टोला शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लगावल आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकारकडून ट्रेन सोडण्यात आहे. यावरून केंद्र आणि राज्यात राजकारण तापले आहे.

महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये,” असे ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत,” असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल (२४ मे) फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हटले होते. यावरू पियुष गोयल यांनी प्रतिउत्तर ट्वीट करत म्हणाले, “महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे,” असे तुम्ही सांगितले.

पियुष गोयल काय म्हणाले

गोयल ट्वीटमध्ये म्हणाले, उद्धवजी आशा आहे तुम्ही स्वस्थ असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी तयार आहे, असे तुम्ही सांगितले. तसेच तुम्ही स्थलांतरित मंजुरांची ही यादी कृपया रेल्वे मंत्रालयाकडे पाठवावी. त्याचबरोबर ट्रेन कुठून सोडायची आहे. ट्रेट्रेन स्टेशनवर आल्यावर त्या आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तुम्हा जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील,” असे गोयल यांनी स्पष्ट केले.

सरकारने २०० ट्रेनसाठी मजुरांची यादी रेल्वेकडे दिल्याचा दावा केला आहे. पण मध्य रेल्वेने सतत पाठपुरावा करूनही महाराष्ट्र सरकारकडून कालपर्यंत एकही यादी रेल्वेच्या मंत्रालयाकडे आलेली नाही. कृपया यादी लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी, असे आवाहन ही रेल्वेमंत्रींनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले

राज्य शासनाला या श्रमिकांचे ओझे नव्हतेच; परंतु मजूर घरी जाऊ इच्छित होते त्यांना ट्रेनच्या माध्यमातून घरी जाण्याची मान्यता मिळवल्यानंतर सुमारे ७ लाख मजूर ४८१ ट्रेन्सच्या माध्यमातून त्यांच्या राज्यात गेले. यांच्या प्रवासी भाड्याची ८५ टक्क्यांची रक्कम केंद्र सरकार राज्याला देईल तेव्हा देईल परंतु त्या आधी राज्य शासनाने मजुरांच्या प्रवास शुल्कासाठी १०० टक्के खर्च करत आतापर्यंत ८५ कोटीहून अधिक रक्कम उपलब्ध करून दिली आहे. राज्याची रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी असताना केवळ ३० ते ४० ट्रेन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मजुरांची व्यवस्थित नोंदणी करून त्यांना चांगल्या पद्धतीने पाठवले जात आहे त्यामुळेच जातांना परराज्यातील हे मजूर महाराष्ट्राचा जयजयकार करत परतत आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रेल्वेप्रमाणेच राज्याच्या ३२ हजाराहून अधिक बसेसद्वारे ३ लाख ८० हजार मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. यावर राज्य शासनाने ७५ कोटी रुपये खर्च केले आहेत.

संबंधित बातम्या

‘या’ कारणामुळे पियुष गोयल चिडले मुख्यमंत्र्यांवर

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात येणार – अमित देशमुख

News Desk

कोरोनाचे आव्हान कायम ! कुठेही गर्दी, नियमांचे उल्लंघन चालणार नाही । मुख्यमंत्र्यांचे आदेश

News Desk

कोरोनाच्या काळात फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल!

News Desk