HW News Marathi
महाराष्ट्र

हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!

मुंबई। राज्यातील महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी काल (२० नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे आघाडीच्या नेत्यांनी सांगितले. राज्यात सत्ता स्थापनेचे एक नवे समीकरण पहायला मिळणार आहे.

तसेच शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद वाढल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. शरद पवार यांच्याकडे साडेतीन तास झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही पक्षांत ठरलेला किमान समान कार्यक्रम शिवसेनेने स्वीकारण्यावर व सत्तावाटपावर चर्चा आज (२१ नोव्हेंबर) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊतांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे.

हम बुरे ही ठीक है, जब अच्छे थे तब कौनसा मेडल मिल गया था..!!, अशा ट्विटमधून त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. तत्पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी आता पेढ्यांची ऑर्डर द्यायला हरकत नाही, असे सांगून गोड बातमी लवकरच येईल, अशी माहिती काल माध्यमांशी बोलताना दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची !

News Desk

अशोक चव्हाणांचं शिवसेनेच्या माजी आमदाराला प्रत्युत्तर….

News Desk

‘राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची निवड’, हायकोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष!

News Desk